Wednesday, December 30, 2020

*पाप कुठे जात असते* ? गंगा नदीत पाप धुतले जाते का???

*पाप कुठे जात असते* ?

     एकदा एका ऋषींनी विचार केला की लोक गंगेत पाप धुण्यास जातात, तर याचा अर्थ सर्व पाप गंगेमध्ये विरघळल्या गेले असेल आणि गंगा देखील पापी बनली असेल.

पण *गंगा* तर पापी नाहीये, मग हे पाप कुठे जात असेल?

हे जाणून घेण्यासाठी त्याने तपश्चर्या सुरू केली.

कठोर तपश्चर्या केल्यामुळे देव प्रसन्न झाले. 

देव त्या ऋषी समोर प्रकट झाला.

*ऋषींनी देवाला विचारले " हे देवा सर्व लोक गंगे मध्ये आपले पाप धुण्यासाठी येतात मग ते धुतलेले पाप कुठे जाते*?"

भगवान म्हणाले की " चल आपण त्या गंगालाच विचारू."

ते दोघे गंगाजवळ गेले आणि म्हणाले, "हे गंगे ! इथे सर्व लोक येऊन त्यांचे पाप धुतात, ते सर्व पाप तुझ्या पाण्यात मिसळले आहे, तर मग आम्हाला सांग की तू सुद्धा आता पापी झाली आहेस ना?"

*गंगा म्हणाली, "मी का म्हणून पापी होईल?, मी तर ते सर्व पाप घेऊन समुद्राला अर्पण करत असते*!"

आता ते लोक समुद्राकडे गेले, आणि समुद्राला विचारले "हे समुद्र देवता , गंगा म्हणाली की ती तिचे सर्व पाप तुम्हाला येऊन अर्पण करते, याचा अर्थ असा की आपण देखील पापी झाला आहात!"

*समुद्र* म्हणाला, "मी पापी कसा असेन?, मी ते सर्व पापे घेतो आणि त्याची वाफ बनवून त्या ढगांना देऊन टाकतो !"

आता ते लोक *ढगांकडे* गेले आणि म्हणाले, "हे ढगांनो! ज्या समुद्राने जे पाप गंगे कडून घेतले, ते त्याने *वाफ* बनवून तुम्हा ढगांना दिले आहे. तर आता याचा अर्थ असा की आपण पापी झाला आहात! "

*ढग म्हणाला... " मी कसा काय पापी होईल ? मी तर ते सर्व पावसाच्या* रूपाने पृथ्वीवर पाठवतो. या पावसामुळे शेतात *पीक* येत. हे उपजलेले पीक, *अन्न* म्हणून सर्व लोक खातात. हे अन्न ज्या मानसिकतेने पिकविल्या जाते, त्याच वृत्तीने त्यांना ते प्राप्त होते. आणि ज्या *मानसिकतेने* माणसाकडून खाल्या जाते , त्याच मानसिकतेचा मनुष्य बनतो. त्यानुसार, मानवी मानसिकता तयार होते "

कदाचित म्हणूनच म्हणतात  *जो जैसा खाएं अन्न, वैसा बनता उसका मन*

*म्हणूनच अन्न हे ज्या वृत्तीने मिळवलं जात असत आणि ज्या मानसिक स्थितीत खाल्ले जाते, तसेच त्या माणसाचे विचार बनत जातात*.

*या करिता अन्न नेहमीच देवाचे अन्नदाता किसान जन्मदाता  नाव घेत घेत आणि शांत मनस्थितीत खावे*.   

*अन्नग्रहण करण्यापूर्वी करावयाची प्रार्थना – `हे देवा,  हे अन्न दाता जन्मदाता 🙏🙏 तुझ्या चरणी अर्पण करून तुझा प्रसाद या भावाने मी ग्रहण करत आहे. या प्रसादातून मला शक्‍ती व चैतन्य मिळू दे*

*🪔ओम नमो नारायणाय*🚩
.

Sunday, December 6, 2020

https://youtu.be/4RuCJ01Q6HMइंडीयन आयडॉल युवराज मेढे यांचे घरी जावून मुलाखत घेतली पुढील भागात त्याचे भावाची खास मुलाखत,,,🙏🙏🙏🙏 आपल्या शुभेच्छा संदेश पाठवा स्वागत आहे 🎉🎉🙏🙏8208361187

https://youtu.be/4RuCJ01Q6HM
इंडीयन आयडॉल युवराज मेढे  यांचे घरी जावून मुलाखत घेतली पुढील भागात त्याचे भावाची खास  मुलाखत,,,🙏🙏🙏🙏 आपल्या शुभेच्छा संदेश पाठवा स्वागत आहे 🎉🎉🙏🙏
8208361187

Saturday, December 5, 2020

महा आवास अभियानांतर्गत प्रलंबित घर बांधणीला गती द्यावी -विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार


 
 नागपूर, दि. 26: ग्रामीण भागातील  प्रधानमंत्री आवास योजनेसह रमाई, शबरी, पारधी, आदिम, अटल कामगार आवास योजना या सर्व योजनेतील प्रलंबित व अपूर्ण असलेल्या घरबांधणीला  महा आवास अभियानास गती देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज  विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित ऑनलाईन कार्यशाळेत दिले. 
   यावेळी  आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त दीपक हेडाऊ, उपायुक्त विकास शाखा अंकुश केदार, सहाय्यक विकास शाखा सुनील निकम, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण डॉ. सिद्धार्थ गायकवाड,  सहाय्यक आयुक्त कामगार विभाग राजदीप धुर्वे उपस्थित होते. 
 या ऑनलाईन कार्यशाळेत विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व गटविकास अधिकारी यासह अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. महा आवास अभियानांतर्गत “ सर्वांसाठी घरे ” या धोरणांतर्गत अभियान राबवून सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये पंचायत राज संस्था, स्वयंसेवी संस्था, सहकारी, खाजगी संस्था, बँका, लोकप्रतिनिधी, लाभार्थी, ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग असणार आहे. ग्रामीण भागातील घरांचा दर्जा व गुणवत्ता वाढविण्यावर भर असणार आहे. 
 महा आवास अभियान 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या शंभर दिवसांच्या कालावधीत राबविण्यात येईल. या अभियानात भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे. घरकुलांच्या उद्दिष्टांप्रमाणे मंजुरी देणे, मंजूर घरकुलांना हप्त्यांचे वितरण करणे तसेच घरकुल भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे व प्रलंबित घरकुलांच्या कामांना गती देण्याचे नियोजन आहे. यासाठी ग्रामीण गवंडी प्रशिक्षण तसेच पंचायत समिती निहाय्य  डेमो हाऊसेस उभारणे  या अभियानात फक्त घर न बांधून देता लाभार्थ्यांला त्या व्यतिरिक्त स्वच्छ भारत मिशन मधून शौचालय, जल जीवन मिशन मधून पिण्याचे पाणी, उज्ज्वला योजनेतून गॅस जोडणी व सौभाग्य योजनेतून विद्युत जोडणी तसेच जीवनोन्नती उपजीविकेचे साधन देण्यात येईल. 
 या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकताच 20 नोव्हेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृहावर पार पडला. ग्रामीण बेघरांसाठी महा आवास अभियान महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता. राज्यात सुमारे 8.82 लक्ष घरकुलांची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठीच विभागस्तरीय कार्यशाळा आज घेण्यात आली. त्यानंतर जिल्हास्तरीय व ग्रामस्तरीय कार्यशाळा देखील घेण्यात येणार आहे. या योजनेचा नागरिकांमध्ये  प्रचार, प्रसार व जाणीव जागृती होऊन अभियानाचा हेतू साध्य करण्याचे विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशित केले.  
 अभियानासाठी जिल्हा पातळीवर पाठपुरावा करुन तसेच वेळोवेळी आढावा घेवून अभियानात येणाऱ्या अडचणींना सोडविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. अपूर्ण घरांच्या बांधकामावर लक्ष केंद्रीत करुन ती पूर्णत्वास नेण्याला प्राधान्य देण्याचेही विभागीय आयुक्तांनी सांगितले. 
                                                                          00000

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...