Wednesday, December 30, 2020

*पाप कुठे जात असते* ? गंगा नदीत पाप धुतले जाते का???

*पाप कुठे जात असते* ?

     एकदा एका ऋषींनी विचार केला की लोक गंगेत पाप धुण्यास जातात, तर याचा अर्थ सर्व पाप गंगेमध्ये विरघळल्या गेले असेल आणि गंगा देखील पापी बनली असेल.

पण *गंगा* तर पापी नाहीये, मग हे पाप कुठे जात असेल?

हे जाणून घेण्यासाठी त्याने तपश्चर्या सुरू केली.

कठोर तपश्चर्या केल्यामुळे देव प्रसन्न झाले. 

देव त्या ऋषी समोर प्रकट झाला.

*ऋषींनी देवाला विचारले " हे देवा सर्व लोक गंगे मध्ये आपले पाप धुण्यासाठी येतात मग ते धुतलेले पाप कुठे जाते*?"

भगवान म्हणाले की " चल आपण त्या गंगालाच विचारू."

ते दोघे गंगाजवळ गेले आणि म्हणाले, "हे गंगे ! इथे सर्व लोक येऊन त्यांचे पाप धुतात, ते सर्व पाप तुझ्या पाण्यात मिसळले आहे, तर मग आम्हाला सांग की तू सुद्धा आता पापी झाली आहेस ना?"

*गंगा म्हणाली, "मी का म्हणून पापी होईल?, मी तर ते सर्व पाप घेऊन समुद्राला अर्पण करत असते*!"

आता ते लोक समुद्राकडे गेले, आणि समुद्राला विचारले "हे समुद्र देवता , गंगा म्हणाली की ती तिचे सर्व पाप तुम्हाला येऊन अर्पण करते, याचा अर्थ असा की आपण देखील पापी झाला आहात!"

*समुद्र* म्हणाला, "मी पापी कसा असेन?, मी ते सर्व पापे घेतो आणि त्याची वाफ बनवून त्या ढगांना देऊन टाकतो !"

आता ते लोक *ढगांकडे* गेले आणि म्हणाले, "हे ढगांनो! ज्या समुद्राने जे पाप गंगे कडून घेतले, ते त्याने *वाफ* बनवून तुम्हा ढगांना दिले आहे. तर आता याचा अर्थ असा की आपण पापी झाला आहात! "

*ढग म्हणाला... " मी कसा काय पापी होईल ? मी तर ते सर्व पावसाच्या* रूपाने पृथ्वीवर पाठवतो. या पावसामुळे शेतात *पीक* येत. हे उपजलेले पीक, *अन्न* म्हणून सर्व लोक खातात. हे अन्न ज्या मानसिकतेने पिकविल्या जाते, त्याच वृत्तीने त्यांना ते प्राप्त होते. आणि ज्या *मानसिकतेने* माणसाकडून खाल्या जाते , त्याच मानसिकतेचा मनुष्य बनतो. त्यानुसार, मानवी मानसिकता तयार होते "

कदाचित म्हणूनच म्हणतात  *जो जैसा खाएं अन्न, वैसा बनता उसका मन*

*म्हणूनच अन्न हे ज्या वृत्तीने मिळवलं जात असत आणि ज्या मानसिक स्थितीत खाल्ले जाते, तसेच त्या माणसाचे विचार बनत जातात*.

*या करिता अन्न नेहमीच देवाचे अन्नदाता किसान जन्मदाता  नाव घेत घेत आणि शांत मनस्थितीत खावे*.   

*अन्नग्रहण करण्यापूर्वी करावयाची प्रार्थना – `हे देवा,  हे अन्न दाता जन्मदाता 🙏🙏 तुझ्या चरणी अर्पण करून तुझा प्रसाद या भावाने मी ग्रहण करत आहे. या प्रसादातून मला शक्‍ती व चैतन्य मिळू दे*

*🪔ओम नमो नारायणाय*🚩
.

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...