रावेर अनेक वर्षे पासून बंद असलेली भुसावळ कटणी रेल्वे गाड्या सुरू झाल्या बद्दल रावेर रेल्वे प्रवासी मित्र नेते राष्ट्रीय जनता दलाचे नेते श्री प्रशांत बोरकर यांनी मध्य रेल्वे प्रशासनाचे धन्यवाद व्यक्त केले असून जळगाव साठी सकाळी सात वाजता रेल्वे सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
जनरल तिकीट सुरू नसल्याने आणि प्सेंजर गाड्या सुरू नसल्याने विद्यार्थी आणि कामगार मजुर व्यापारी दुकानदार यांची मोठ्या प्रमाणावर गेरसोय होत आहे.
काही महिन्यांपासून भुसावळ इतारशी मेमु ट्रेन सुरू झाली परंतु योग्य वेळ नसल्याने प्रवाशी यांना रेल्वे सेवाचा लाभ घेता येत नाही.म्हणून सकाळी जळगाव साठी खंडवा रावेर हून जळगाव अमळनेर नंदुरबार अशी मेमु पेसेजर ट्रेन तसेच मुंबई पुणे अमरावती साठी विशेष गाड्या सुरू करावी अशी अपेक्षा रेल्वे प्रवाशी मित्र श्री प्रशांत बोरकर रशीद तडवी रामकृष्ण चौधरी सुभाष अकोले यांनी व्यक्त केली आहे
No comments:
Post a Comment