बऱ्याच वेळा असे वाटते की मी जे सांगतो तेच खरे आहे मग आपण त्या साठी भांडण करतो,केव्हा केव्हा आपले म्हणणे ही चुकीचे माहितीचे आधारावर असले तर ते चुकीचे असणार आहे त्यावेळी आपण क्रॉस चेक करणे आवश्यक असते
कारण चुकीचे धारणामुळे कुठे तरी फसू शकतो तोंडावर पडू सकतो
आपणास आपली भूमिका चुकीची आहे हे समजून सांगत असेल तर आपण नक्की ती बाजू ऐकून घेतली पाहिजे त्यावर सत्य असेल तर सहमत झाले पाहिजे त्यात आपण कमीपणा करून घेऊ नये,
कारण आपण जर प्रत्येक वेळी अनुभव घेण्याचा प्रयत्न केला तर आपले आयुष्य कमी पडेल पर अनेक गोष्टी लक्षात येणार नाहीत
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोष्ट खरच सत्य आहे का याची शहानिशा करून मग ती फॉरवड केली पाहिजे
संत यांनी सांगितले आहे की निदकांचे घर असावे शेजारी,, असो आपण आपल्या मनात विचार करत असतात त्यावर चर्चा करा
चुकीचे विचार केव्हा केव्हा विकार असतात हे ध्यानी घ्या कोणत्याही प्रकारचे पूर्वग्रहदूषित मीडिया सेल चे मॅसेज फॉरवड करू नका स्वतः एक जबाबदार नागरिक म्हणून संदेश मॅसेज सर्च करा अधिक माहिती मिळवा
निर्भयपणे निपक्ष पणे आपले मत तयार करावे,
🎯🎯🎯🙏🙏🤏👉🌈🌈🔜
No comments:
Post a Comment